प्रियंवदा विद्यालया कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन* ………………………………………… *बारावीच्या परीक्षेत कु. कामिनी मलोडे प्रियंवदा विद्यालयातून सर्वप्रथम* …………………………………….. *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*प्रियंवदा विद्यालया कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन*
…………………………………………
*बारावीच्या परीक्षेत कु. कामिनी मलोडे प्रियंवदा विद्यालयातून सर्वप्रथम*
……………………………………..
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
*भिवापूर*
*उपसंपादक:- प्रदीप लोखंडे*
नुकत्याच पाच मे 2025 रोज सोमवारला दुपारी एक वाजे नागपूर विभागीय मंडळ नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एच. एस. सी.) परीक्षेत फेब्रुवारी 2025 मध्ये प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी ता. भिवापूर, जिल्हा. नागपूर येथील कु. कामिनी परसराम मलोडे हिने कला शाखेतून परीक्षेत एकूण 600 पैकी 390 गुण (65%)संपादित करीत विद्यालयातून प्रथम स्थानाची मानकरी ठरली. तर द्वितीय स्थानावर विद्यालयातील सुमित जगदीश कुकडे या विद्यार्थ्याने 600 पैकी 376 गुण(62%) प्राप्त करून विद्यालयात द्वितीय स्थानावर बाजी मारली.
तसेच कु. रिया अरुण मंडपे या विद्यार्थिनीने 600 पैकी 360 गुण(60% )संपादित करीत विद्यालयात तिसऱ्या स्थानावर यशस्वी ठरली.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था भिवापूर चे अध्यक्ष महोदया मा. डॉ. माधुरीताई सुरेशबाबू बोराडे, संस्थेचे सचिव मा. रणजीत सुरेशबाबू बोराडे तथा विद्यालयाचे प्राचार्य मा. राजू शिवणकर सर यांना दिले.
सदर गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजू शिवणकर सर, राकेश उमरेकर सर ,राजू सागरे सर, विनोद ननावरे सर, विलास तांबे सर ,भुजाडे मॅडम , विजय सहारे सर ,प्रदीप लोखंडे सर, ,फुलचंद ठाकूर सर,भारत शेंडे सर, दुर्गा रडके मॅडम, तनु भोयर मॅडम आदी शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पेढा भरवीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील भावी उज्वल वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्यात.
विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये नागपूर विभागीय मंडळ च्या जाहीर निकाल यादीत मुलांच्या तुलनेने मुलींनीच गुणवत्ता यादीत मुसंडी मारल्याचे दिसून येते. हे मात्र खरे असले तरी यावर्षी राज्य शिक्षण मंडळाने संपूर्ण राज्यात इयत्ता बारावी तथा दहावीच्या बोर्ड परीक्षेत कापीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्याने यावर्षी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कसोटी लागली असल्याचे शिक्षक पालक विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. प्राप्त झालेले टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेने जरी कमी असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचा व त्यांच्या मेहनतीचा त्यांना फळ मिळाला असल्याचे पालक वर्गात बोलले जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
