बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खीर दाना सोबतच गरजूंना मोफत पुस्तके व शैक्षणिक साधने* ……………………………………… *प्रकाश टेंभुर्णे सरांनी दाखवला प्रत्यक्ष कृतीतून मानवतावाद*. …………………………………… *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खीर दाना सोबतच गरजूंना मोफत पुस्तके व शैक्षणिक साधने*
………………………………………
*प्रकाश टेंभुर्णे सरांनी दाखवला प्रत्यक्ष कृतीतून मानवतावाद*.
……………………………………
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल
*उमरेड प्रतिनिधी* :-
*काजल तांबे*
नागपूर बेसा येथील रहिवासी व बौद्ध उपासक आयुष्यमान प्रकाश टेंभुर्णे सर यांनी आपल्या परिवारासह नागपूर येथील पावन दीक्षाभूमी येथे दिनांक 12 मे 2025 रोज सोमवारला बौद्ध पौर्णिमा चा औचित्य साधून अभिनव पद्धतीने बुद्ध जयंती मनोभावे तथा उत्साहाने साजरी केल्याने परिसरात त्यांच्या या अभिनव उपक्रमाचा सर्वत्र कौतुक केल्या जात आहे नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल असे जनमानसात बोलले जात आहे.
बौद्ध पौर्णिमा या पवित्र दिनी प्रकाश टेंभुर्णे यांनी स्वपरिवारासह समस्त विश्वाचे आदर्श मार्गदाते दुःखाचे मुक्तीदाते, अहिंसा व शांतीचे महासागर ,तथागत भगवान गौतम बुद्ध आणि पूज्यनीय बोधिसत्व ,राष्ट्र निर्माते , विश्वभूषण संविधान निर्माते प्रबुद्ध भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलनाने व पुष्प अर्पण करून पूजन अर्चन केले.
यावेळी परिवाराच्या वतीने त्रिसरण पंचशीला सामूहिकरीत्या ग्रहण करून महामानवास अभिवादन करण्यात आले आणि 22 प्रतिज्ञा चे प्रकट वाचन करण्यात आले.
विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावन दीक्षाभूमी नागपूर येथील बौद्ध विहारात टेंभुर्णे दांपत्याकडून पूज्य भंतेजींना वंदन करून बौद्ध उपासकांना खीरदान करण्यात आले.
याशिवाय उपस्थित सर्व बौद्ध उपासक तथा उपासिकांना मोफत फळे व खीर वाटप करण्यात आले.
विशेषत्वाने नागपूर येथील रहिवासी प्रकाश टेंभुर्णे हे बौद्ध उपासक दरवर्षी विजयादशमी, 14 एप्रिल व बौद्ध पौर्णिमा आधी पवित्र दिनाच्या औचित्य साधून समाजातील गोरगरीब, होतकरू, गरजू व उपेक्षित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पुस्तके ,स्पर्धा पुस्तके, आर्थिक मदतीच्या दृष्टीने यथोचित वस्तू व अर्थ दान करतात .शिवाय योग्य दिशेने त्यांना मार्गदर्शन करून ज्ञानदानाचे कार्य सुद्धा करत असतात हे मात्र समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी तथा कल्याणकारी असून
या त्यांच्या अभिनव उपक्रमाने खऱ्या अर्थाने महामानव सिद्धार्थ गौतम बुद्धांचा मानवतावाद याला उजाळा मिळाल्याशिवाय राहणार नाही .
शिवाय सदर उपक्रम मानवता वादाला पुनर्जीवित करण्याचा धाडसी उपक्रम देशात प्रत्येकाने राबवले तरच बुद्धांना अभिप्रेत असलेले समता ,स्वातंत्र्य, न्याय , आणि अहिंसा नांदू शकेल अन्यथा देशाची अधोगती थांबवणे शक्य होणार नसल्याचे प्रतिपादन आदर्श व्यक्तिमत्व प्रकाश टेंभुर्णे सर यांनी जनता टाईमशी बोलताना केले. ते पुढे असेही म्हणाले की मी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा जनकल्याणकारी उपक्रम राबवणार पण याला जोड जर समाजातील इतर नागरिकांची मिळाली तर ते देशाच्या प्रगतीसाठी हिताचेच ठरेल असेही ते जनता टाईमशी बोलले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
